शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२


मी तुला दिसणार नाही !.
.
ऐकाया तुज काही आले, मी बोललेच नाही.
माझिया मनाचे कवडसे मी खोललेच नाही.
त्या निसटत्या पाऊली मी सावरले स्वप्न माझे,
हुरहुरत्या स्पर्शाने मी कधी खुललेच नाही.
आजवरी जे होते, माझे उरलेच नाही,
मद्याह्नीच्या काजव्यांना मी कधी भुललेच नाही. 
अंतरीची आर्त साद ना कधी तू ऐकली,
आज तुजला प्रतिसाद देण्या शब्द मी स्मरलेच नाही.
या पुढे कधीही अशी मी बेसावध असणार नाही,
पाहशी वळूनी जरी तू, मी तुला दिसणार नाही ...
मी तुला दिसणार नाही ..........
..(रत्नकांत)

बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१२

त्या पारंब्यांनाच विचार,
आकाशात जन्म घेऊन मातीत का बरं शिरायचं,
पिंपळापोटी जन्म घेऊन त्यालाच कसं सावरायचं,
आपली प्रीतीही तशीच,
जुनी तरीही ताजी,
कणखर तशीच निर्मळ,
आणि लवलवती तशीच चिवट,
अगदी त्या पारंबीसारखीच...
तुही त्या पारंबीसारखीच........
ज्याच्या सोबत आयुष्य घालवलं, त्याच्याकडे वर मान करून पाह्यलंच नाहीस कधी.
माझ्या सावलीत आयुष्य घालवून तू मात्र रुसलेली...
इतरांना सावली देतो म्हणून....
अग वेडे, इतरांची सावली काढून घेतली असती तर,
तुझं आयुष्य नसतं का वैराण झालं !!!!!
पूस ते डोळे, आणि पहा वर नीट, 
मलाही पाहुदे तो झुकलेला मुखचंद्र,
उन्नत झालेला,
फक्त एकदाच.......
(रत्नकांत)

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१२

आई..................!!!


आई..................!!!

लिहिले ब-याच जनांनी
लिहितील बरेच काही
शब्द साच्यात बंद होई
महती तुझि ग आई..............



केले तु हट्ट पूर्ण
असता मि बाळ तान्हा
पाजुनी मोठे केले
तुझा तु अमृत पान्हा...............




आई तुझ्या प्रितीचे
जगात ह्या मोल नाही
तव अंगाई गिताने
मज शांत झोप येई....................



आई म्हणु मि कोणा
न साद कूणी देई
हंबरुणी वासराचा
कोरडा हा कंठ होई.....................


आई म्हणु तुला ग
शकुला हा तुझा पुकारी
जरी स्वामि तिन्ही जगाचा
तव विना मि भिकारी  ..................


मोहन कु-हाडे .........................

मंगळवार, १३ नोव्हेंबर, २०१२

आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको



मराठी गाण्यांमध्ये भावगीताला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे आणि त्यातूनही जर ते सुधीर फडके यांनी गायलेले असेल तर मग विचारायलाच नको. असेच एक भावगीत. ज्याचे शब्द वा. रा. कांत यांचे असून याला यशवंत देव यांचे संगीत लाभलेले आहे. आणि हे गीत म्हणजे 'आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको' ज्याला हे गाणे माहित नसेल असा व्यक्ती विरळच. आणि आज याचं गाण्याची चाल मी उचलली आहे माझ्या ओळींसाठी. यामागे मूळ गाण्याचा किंवा त्यामागे असणाऱ्या मोठ्या लोकांचा उपमर्द करणे हा कोणताही हेतू नाही. फक्त एक तात्पुरता विरंगुळा म्हणून मी हे इथे टाकतो आहे.

आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको
चांगल्या गाण्याची अशी वाट तू लावू नको
आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको ||

ऐकताना समोरचे होते जे कुजबुजणे
पाहतांना मला मात्र नको होते हे जिणे
चांगल्या कारेक्रमाला गालबोट लाऊ नको ||

रोखुनी पलकात पाणी, बोल सारे ऐकले
अन् तुझ्या हट्टापुढे गं हात माझे टेकले
या घडीला वाहवेची दाद तू मागू नको ||

काय बोलू म्हणने माझे आज तरी पटेल का?
आवाजाची आज तुझ्या, लाज तुला वाटेल का?
नितनवी गाणी म्हणत, तू अशी जागू नको ||

आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको
चांगल्या गाण्याची अशी वाट तू लावू नको
आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको ||

मिलिंद जोशी, नाशिक

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१२

आजचा निबंध... महागाई

आजचा निबंध... महागाई ( वा... काय विषय आहे... मस्त... लै भारी... )

आज महागाई या विषयावर मला लिहायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. सध्या सगळ्यांच्या तोंडी हा एकच शब्द असतो. खरे तर महागाई म्हणजे काय हे सांगण्याची काही गरज नाहीये. पण निबंध म्हटला की त्या शब्दाचा अर्थ हा सांगावाच लागतो. तसा अलिखित नियमच आहे. 
महागाई म्हणजे जी सगळ्यात मोठ्ठी, महत्वाची, सगळ्यात शक्तिशाली गाय असते ती. म्हणूनच तिला महागाई असे म्हणतात. खोटे वाटते तुम्हाला? उदा. देवांचे देव म्हणजे महादेव, पैसा, संपत्ती, लक्ष्मी यांची देवता महलक्ष्मि, सगळ्यात वरचा मंत्री म्हणजे महामंत्री तसेच सगळ्यात शक्तिशाली गाई म्हणजे महागाई. कळलं?????? ( टीव्हीवरील टुकार सिरीयल ‘पुढंच पाऊल’ मध्ये आक्कासाहेब सुद्धा नेहमी असेच म्हणत असतात. कोणालाही... बहुतेक त्यांना फक्त हा शब्द उच्चारला तरच एपिसोडचे पैसे मिळतील असे त्या सिरीयलच्या निर्मात्याने बजावून सांगितले असावे... असो मला काय करायचे... )
मला महागाई खूप आवडते. आपल्या सरकारला सुद्धा महागाई खूप आवडते. याला दोन कारणे आहेत 
१. आपला बहुसंख्य हिंदू धर्मियांचा देश आहे आणि हिंदूंना गाय माता वाटते. 
२. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्याला अनेक कारणाने गाय ही महत्वाची असते. 
आणि ही तर महागाई... मग नको का आवडायला? जसे महादेव, महलक्ष्मि अगदी महामंत्री सुद्धा सामान्य जनतेसाठी अदृश्य रुपात असतात तशीच महागाई सुद्धा अशीच अदृश्य रुपात असते पण वेळोवेळी आपले अस्तित्व लोकांना दाखवीत असते. महागाईला चार पाय असतात. सरकारी नोकरी, आय टी कंपनीतील नोकरी, कार्पोरेट नोकरी ( व्यवस्थापन क्षेत्रातील ) आणि राजकारण असे ते चार पाय होत. या चार पायांच्या जोरावर ती खंबीरपणे उभी असते. तिच्या तोंडाला सरकारी बाबू असे नांव आहे. ते नेहमी काहीतरी खात असते आणि एरवी रवंथ करीत स्वस्थ बसलेले असते. तिच्या डोळ्यांना CBI असे संबोधले जाते. ते नेहमी तेच पाहतात जे तिचा मालक ( सरकार ) त्यांना पाहायला सांगतात. तिला दोन शिंगे सुद्धा असतात. सबसिडी कपात आणि भाववाढ. ही शिंगे महागाईची महत्वाची अस्त्रे आहेत. तिला दोन कान सुद्धा असतात. काही जण उगीचच त्यातील एकाला विरोधी पक्ष आणि दुसऱ्याला मिडिया असे म्हणतात. तिला एक भले मोठे पोट आहे. त्याला काहीजण अर्थव्यवस्था असे म्हणतात. सरकार नेहमी याची काळजी घेते. असे म्हणतात की या पोटात ३३ कोटी राजनेत्यांचा वास असतो. ( वास म्हणजे राहणे... उगाच गैरअर्थ काढू नका ) तिला एक शेपटी असते. ज्याला जनता असे म्हटले जाते. थोडक्यात काय तर ३३ कोटी राजनेत्यांनी लटकवलेली ती... जनता... त्यामुळे या जनतेच्या वाट्याला अर्थव्यवस्थेतून न पचलेला भाग... ( कोणी कोणी त्याला शेण असे म्हणतात ) तेवढा येतो. जशी सामान्य गाय दुध देते तशी ही महागाई आपल्याला नवीन नवीन योजना देते. उदा. FDI, खुली आणि निर्बंधित अर्थव्यवस्था, निर्यातीवर प्रतिबंध इत्यादी इत्यादी. अशी ही महागाई मला खूप खूप आवडते... त्यासाठी तर मी तिची आरती सुद्धा लिहिली आहे. मला वाटते जी सगळ्यांनी रोज किमान दिवसातून ३ वेळेस तरी म्हटली पाहिजे...

जय जय महागाई बोला जय जय महागाई 
तुमच्या दर्शनाने २ घाबरते बाई, बोला जय जय महागाई ||

तुमच्या कृपेने होती प्रजाजन हो त्रस्त देवी प्रजाजन हो त्रस्त
येणाऱ्या पगारावर 2 ठेवू कशी भिस्त, बोला जय जय महागाई ||

तुम्ही कृपा ही केली झाली मला पीडा देवी झाली मला पीडा
१० रुपये खर्चूनही 2 आज मिळत नाही विडा, बोला जय जय महागाई ||

तुमच्या येण्याने देवी सुखावती राजकारणी देवी सुखावती राजकारणी
इथूनच भ्रष्टाचाराची 2 होते पायाभरणी, बोला जय जय महागाई ||

तुमचा वापर देवी राजकारणी करिती देवी राजकारणी करती 
मिलिंद प्रेरित झाला 2 केली आरती तुम्हावरती, बोला जय जय महागाई ||

मिलिंद जोशी, नाशिक...

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१२

स्वर्गसुखाचा अर्णव त्यागुनी तुझियासाठी आलो,


तुझ्या प्रीतीचा गंधित शेला चांदण्यात मी ल्यालो .

सोडूनी सिंहासने जरी मी पायउतार झालो,

स्वेच्छेने तव हृदयमंदिरी फकीर होऊनी जगलो.


रविवार, ४ नोव्हेंबर, २०१२

तुला चांदण्यात गाताना पाहून माझ्या नजरेला पडली भूल,

नुझे नेत्र मिटलेले, अन हात सतारीच्या तारांवर नाचण्यात मश्गुल.....


आकाशी धुंद चांदण्याची बरसात, अवनीवर सूर बोलती सात,


निसर्गावर पसरली शब्द-सुरांची सुगंधी बिसात......


बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१२

कोणती ती परी आज अवनीवर आली, 

जादुई नगरीची स्वये सम्राज्ञी झाली,

गिरकी घेता तिच्या वदनावर रुपेरी प्रभा पसरली,

रिझविते ती सार्यांना अखंड रात्र सारी.

(अद्याक्षरे घ्या)


(को जा गि री..)

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

लावणी



गजरा ..

राया इष्काचा गजरा माझ्या केसात गुपचूप माळला ,
झाला बोभाटा आपल्या प्रेमाचा, गंध गावात दरवळला ...।।
ज्वानीचा प्रसाद दावला मी तुम्हाला
उपाशी पोटी तुम्ही लावला मुखाला
कसं रातीला पारणं फिटलं,
झाला बोभाटा .......।।१।।
तुमच्या इष्काचा गजरा लई न्यारा
भरल्या बाजारी मिरवीते मी तोरा
कशा झेलू मग वखवख नजरा,
झाला बोभाटा .......।।२।।
आता झाला शृंगार माझा पुरा
आणा डोली बिगीन माझ्या दारा
उबरठ्यावर लोटा घरंगळला,
झाला बोभाटा .......।।३।।

..
(RJN).............
रत्नाकर नाईक ........

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

शपथ प्रेमाची:
नजरेस तुझ्या स्वप्नांची लाभली अनंगी छाया,
उधळली जशी रतिवरती मदनाची अथांग माया.
अधरांच्या कोमल कलिका प्राषति रंग प्रीतीचे,
अलवार स्पर्शता त्यांना थरथरले क्षण रातीचे.
ती ओढ अनामिक मजला लागते तुझ्या भेटीची
पाऊले टाकितो राया ये जशी लाट भरतीची.
आभाळ भरोनी येई शमविण्या क्षुब्ध धरतीला,
वर्षाव साहण्यापरता तुज मार्ग नसे परतीला.
हे सप्तरंग प्रेमाचे सजवितील कोमल काया,
हा निसर्ग घेउनी ताना मग दावील अपुली किमया.
लाभेल मनाला शांती होईल तनुची तृप्ती,
नेत्रात नव्या नात्यांच्या फुलतील अलौकिक ज्योती.
***
जगण्यात कधी नच होती जी आर्त असोशी मजला,
सरणावर ना सरण्याची मी शपथ वाहतो तुजला....
.....(RJN)
म्हणे आजच्या माझ्या वागण्यातून तू दुखावलीस....
आठवतंय का ? माझ्या मायाळू कटाक्षाने शेवटचं कधी बरं सुखावलीस....
कालची माझी कुजबुज, गोंगाट वाटतो आज तुला,
खरंच सांग, माझा तेव्हाचा उबदार स्पर्श ,भाजतोय आज तुला..??
....(RJN)
पाहत होतो वरून तुला, 
माझ्या विरहात रडताना,
मी गेलो तरी तू मात्र आपलं गुपित दडवून ठेवल होतंस,
तुझे अश्रू मात्र फितुरी करू पहात होते,
माझी बदनामी टाळण्यासाठी तू फारमोठं धाडस करू धजलीस....
ते माझ्यासाठी मोलाचं होतं,
तुझा दुःखाचा डोंगर जगापासून दडून राहावा यासाठी,
मी पाऊस बनून आलो,
तुझ्या गालावरची आसवे माझी सवंगडी झाली......
जगाला दिसणार नाहीत तुझे अश्रू,
मी त्याना माझ्यात सामाऊन घेतलंय,
पण हे शेवटचेच हं,
तुला रोज रोज असं पावसात भिजता येणार नाही,
कोरड्या मातीत तसंही रुजता येणार नाही,
जिवंतपणी तुला काही देऊ शकलो नाही......
माझ्या आठवणी आता तूच मला परत दे..........
मला त्या परत मिळायलाच हव्यात,
मी गेल्यावर तुला सुखी ठेवण्याचा
हा एकाच मार्ग आता उरलाय....... (RJN)
माणसाच्या जगण्याचा आणि जगण्याच्या प्रयोजनाचा शोध अनादी काळापासून सुरु आहे , आणि तो सुरूच राहणार आहे.
ज्यांना तो लागला ते प्रेषित ठरले. बुद्ध, महावीर, नानक यांनी लोकांना तो मार्ग दाखवला.
परंतु त्यांचे अनुयायी मात्र नेमके उलट मार्गाने जात राहतात हीच तर शोकांतिका आहे,..
त्यामुळे असा शोध लागेपर्यंत आपण चालत राहायचे. 
चालता चालता नवनवीन शोध लागत रहातात, आपण त्यांचा आनंद घ्यावा.
अवघड गोष्टींची आस लागणे हे स्वत्वाच्या जाणिवेचे एक लक्षण आहे,...
याचा अर्थ आपले अंतर्मन जागृत आहे.
आणि जागृत अंतर्मनाच्या माणसाना जागोजागी अज्ञानाचा सामना करावा लागतो,....
आणि असा सामना करतानाच समविचारी व्यक्तींचा शोध लागतो....
एकूणच काय, असा शोध घेत राहण्यामुळे आपल्याला इतरांहून वेगळा असा आत्मानंद प्राप्त होतो...
(रत्नकांत ...)
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे असावे हा आग्रह किंवा दुराग्रह आपण का बाळगावा ?
ज्याने त्याने आपापल्या परीने ते शोधावे ! 
किमान ज्याच्याकडे आहे, त्याच्या मागे आपण ठामपणे उभे राहावे असे मला वाटते.
ज्यांच्या अंगी हाती घेतलेल्या कार्यात यश येईल कि नाही याचा विचार न करता अखंड पाठपुरावा करण्याची चिकाटी आहे. स्वतःच्या भूमिकेची स्पष्ट जाणीव आणि मायभूमी विषयी नितांत भक्ती आहे, अशा व्यक्तींना होणारा प्रचंड विरोध, आणि तो सहन करायची त्यांची ताकद पहिली, कि हात आपोआप सलाम करायला वर जातो.
त्यांना पाठींबा देऊन त्यांचे बळ वाढवणे, एव्हढे सोपे काम तर प्रत्येक सुजाण माणसाला सहज जमेल. 
त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधात बसायची गरज नाही.
ती:तुझा कोरडा एकच प्रश्न ...
तू प्रेम करतेस का माझ्यावर...
मी हि न लाजता ..पटकन उत्तर द्यायची ...
हो रे ....तुला माहित नाही का?...
आणि तू निमूट पणे..निघून जायचास ....
...[THIS PART IS COMPOSED BY MY FRIEND SADHANA VARMA]
.
तो:माझे ते जाणे तुला कदाचित बोचले असेल...
पण खरं सांगू, मला हे ऐकू येईल अशी अशाच मी सोडली होती.
नकार ऐकायची सवय कधीचीच अंगवळणी पडली होती.
वाटायचं, तू लगेच म्हणशील, "मी थट्टा केली"
मला ते ऐकायचे नव्हते ,
हा होकार कल्पांतापर्यंत मला माझ्या कानात निर्भेळ साठवून ठेवायचा होता,
म्हणून मी जायचो.......
......[THIS PART IS COMPOSED BY ME]..
......RJNAIK
विश्वासाचे झाड रुजायला बी जमिनीत खोल पुरावे लागते,
मग ते झाड खूप उंच वाढते...
मात्र त्याचे खोड अत्यंत नाजूक असते...
गैरसमजाच्या हलक्याश्या झुळुकीनेहि ते उन्मळून पडते.... 
त्यासाठी त्याभोवती समंजसपणाचे काटेरी कुंपण घालावे लागते.....
मी न सांगता कळून घ्यावे हि अपेक्षा जरूर असावी.
पण माझ्या अपेक्षांचे काय?
कि रोजच्या माझ्या रागाचेही तुला व्यसन जडलेय.....!!!
माझ्या हट्टानाही राग समजत आलास,
आठव ते दिवस, माझ्या रागालाही हट्ट समजायचास ....
मी फुलं मागण्या आधीच वेली रुजवायचास, 
चांदणं मागण्या आधीच क्षितीज सजवायचास ...
श्वास घेण्या आधीच पावा वाजवायचास,
अपुऱ्या प्रहरी सांजवायचास, 
मृगाआधी रोहिणी भिजवायचास...
आज तुझा पावा अबोल, मी मात्र मुलुख मैदान..!!!!
तुझा मृग उगवेना, माझा ग्रीष्म अविरत?
चढणीचा सूर्य तळपुन गेला , तिसऱ्या प्रहरी जाताना आता ती तप्तता साहवेना...
आयुष्याची गोळाबेरीज करताना, बाकी थोडीतरी उरू दे,
शेवटचे वळण आलेय,
निवांत एकदातरी तुझ्या कुशीत शिरू दे......
निवांत एकदातरी तुझ्या कुशीत शिरू दे........
...(RJN)
कोंडल्या दुःखास भिडती आसवांचे कासरे,
आटल्या कासेस जैसी लुचतात भाकड वासरे....
भंगल्या वचनात कोणी का भरावे पोहरे 
पांगल्या कळपात कैसे सापडावे मोहरे ....,
.....(RJN)
घालून प्रीतीच्या शपथा, ती कधीच रुसली नाही...
वेढ्यात करांच्या अलगद ती कधीच फसली नाही.!
उन्माद तयाचा तिजला का कधीच चढला नाही,
श्वासांचा दबल्या वारू क्षितिजाला भिडला नाही...!!!!!!!
...(RJN)

आज दशहरा, सीमोल्लंघनाचा दिवस. आज लावणीच्या राज्यात प्रवेश करून माझी कविता सीमोल्लंघन करतेय, गोड मानून घ्यावी हि विनंती.... रत्नकांत..
.
.
.
.....
गजरा ..
.
राया इष्काचा गजरा माझ्या केसात गुपचूप माळला ,
झाला बोभाटा आपल्या प्रेमाचा, गंध गावात दरवळला ...।।
ज्वानीचा प्रसाद दावला मी तुम्हाला
उपाशी पोटी तुम्ही लावला मुखाला
कसं रातीला पारणं फिटलं,
झाला बोभाटा .......।।१।।
तुमच्या इष्काचा गजरा लई न्यारा
भरल्या बाजारी मिरवीते मी तोरा
कशा झेलू मग वखवख नजरा,
झाला बोभाटा .......।।२।।
आता झाला शृंगार माझा पुरा
आणा डोली बिगीन माझ्या दारा
उबरठ्यावर लोटा घरंगळला,
झाला बोभाटा .......।।३।।
.....(RJN)
 —

जीवनाला दान थोडे....

जीवनाला दान थोडे मागायचे आतातरी
रे मना तुझिया कलाने वागायचे आतातरी

ही वजाबाकी नव्याने मोजायची का रे पुन्हा
हे नशीबा मी ठरवले भागायचे आतातरी

काय झाले काल ते हो उगळायचे नाही मला
या जगाला माफ केले, टाळायचे आता तरी

काय सांगू काय होती माझी परी अन् ती कथा

का तिचे मी नाव वेडे काढायचे आतातरी

भोगलेली आपबीती मकरंद मी बोलू कुणा
एकटे मी प्रेत माझे जाळायचे आतातरी

बेहेरे मकरंद
रजी.नं: २७९१०१३०११०२८०९१
=९१ ९७७३५ ०००१०

फेसबुक ची गोस्ट...............!!!

काय सांगू  राजा ह्या 
फेसबुक ची गोस्ट
हौसे, गौसे, नौसे इथे 
सारेच दिसतात मस्त 
                   
कवी लेखक विचारवंतांची 
तर येथे कमीच नाई 
कंपुगिरी वाल्यांची 
तर रीतच हाय  न्यारी 

गृपवाल्यांची संख्या  तर 
लाखोच्या घरात 
नाव सुद्धा राज्या त्यांचे 
लयच हायत खास 

फेक वाल्यांची तर 
अति  कमीच नाई 
ख-या लोकाएचे अति 
काईच खर नाई

लहाना पासून तर मोठ्यांपर्यंत 
सारेच दिसतात अति 
कमतरता नाही कोणाचीच 
नमुने लई भारी 

इथे काही फेस घेऊ 
फेसबुक वर वावरतात 
चेहरा नाही स्वताचा 
नावेही फेकच असतात 

काय सांगू राजा या 
फेसबुक ची गोस्ट 
शेजारच शेम्बड पोट्ट 
तेही दिसते मस्त 

कमेंट नाही देता येत 
म्हणून लाईकच  करते 
दिसली जर एखादी पोट्टी  ओन्लाईन
तर हे बेन गालातच हासते 

समजत नाही काईच याले 
मले बोर लई करते 
रिक्वेस्ट  कशी पाठवू म्हणते 
शेजारच्या बलीले 

फेसबुकवरची गर्दी
जत्रे सारखी झाली 
हवसे गवसे नवसे सतरा 
सारेच हायेत भारी 

- मोहन कु-हाडे...