मराठी गाण्यांमध्ये भावगीताला अनन्य
साधारण महत्व प्राप्त झाले आहे आणि त्यातूनही जर ते सुधीर फडके यांनी गायलेले असेल
तर मग विचारायलाच नको. असेच एक भावगीत. ज्याचे शब्द वा. रा. कांत यांचे असून याला
यशवंत देव यांचे संगीत लाभलेले आहे. आणि हे गीत म्हणजे 'आज राणी पूर्वीची ती प्रीत तू
मागू नको' ज्याला
हे गाणे माहित नसेल असा व्यक्ती विरळच. आणि आज याचं गाण्याची चाल मी उचलली आहे
माझ्या ओळींसाठी. यामागे मूळ गाण्याचा किंवा त्यामागे असणाऱ्या मोठ्या लोकांचा
उपमर्द करणे हा कोणताही हेतू नाही. फक्त एक तात्पुरता विरंगुळा म्हणून मी हे इथे
टाकतो आहे.
आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको
चांगल्या गाण्याची अशी वाट तू लावू नको
आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको ||
ऐकताना समोरचे होते जे कुजबुजणे
पाहतांना मला मात्र नको होते हे जिणे
चांगल्या कारेक्रमाला गालबोट लाऊ नको ||
रोखुनी पलकात पाणी, बोल सारे ऐकले
अन् तुझ्या हट्टापुढे गं हात माझे
टेकले
या घडीला वाहवेची दाद तू मागू नको ||
काय बोलू म्हणने माझे आज तरी पटेल का?
आवाजाची आज तुझ्या, लाज तुला वाटेल का?
नितनवी गाणी म्हणत, तू अशी जागू नको ||
आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको
चांगल्या गाण्याची अशी वाट तू लावू नको
आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको ||
मिलिंद जोशी, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा