विडंबन काव्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विडंबन काव्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १३ नोव्हेंबर, २०१२

आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको



मराठी गाण्यांमध्ये भावगीताला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे आणि त्यातूनही जर ते सुधीर फडके यांनी गायलेले असेल तर मग विचारायलाच नको. असेच एक भावगीत. ज्याचे शब्द वा. रा. कांत यांचे असून याला यशवंत देव यांचे संगीत लाभलेले आहे. आणि हे गीत म्हणजे 'आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको' ज्याला हे गाणे माहित नसेल असा व्यक्ती विरळच. आणि आज याचं गाण्याची चाल मी उचलली आहे माझ्या ओळींसाठी. यामागे मूळ गाण्याचा किंवा त्यामागे असणाऱ्या मोठ्या लोकांचा उपमर्द करणे हा कोणताही हेतू नाही. फक्त एक तात्पुरता विरंगुळा म्हणून मी हे इथे टाकतो आहे.

आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको
चांगल्या गाण्याची अशी वाट तू लावू नको
आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको ||

ऐकताना समोरचे होते जे कुजबुजणे
पाहतांना मला मात्र नको होते हे जिणे
चांगल्या कारेक्रमाला गालबोट लाऊ नको ||

रोखुनी पलकात पाणी, बोल सारे ऐकले
अन् तुझ्या हट्टापुढे गं हात माझे टेकले
या घडीला वाहवेची दाद तू मागू नको ||

काय बोलू म्हणने माझे आज तरी पटेल का?
आवाजाची आज तुझ्या, लाज तुला वाटेल का?
नितनवी गाणी म्हणत, तू अशी जागू नको ||

आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको
चांगल्या गाण्याची अशी वाट तू लावू नको
आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको ||

मिलिंद जोशी, नाशिक

सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

एका तळ्यात होती - विडंबन काव्य



१९५८ मध्ये आलेल्या 'सुखाचे सोबती' चित्रपटातील 'एका तळ्यात होती' या गीताची चाल आजच्या
विडंबनासाठी मी वापरीत आहे. गदिमा यांचे गीत, श्रीनिवास खळे यांचे संगीत आणि आशा भोसले यांचा अप्रतिम आवाज या गीताला लाभलेला आहे. 
विडंबनाबद्दल बोलायचे तर सध्या फेसबुक, सोशल नेटवर्किंग साईटवर आपण खूप ग्रुप बनवतो. त्यात मग काही जण अद्मीन असतात आणि बाकीचे त्या ग्रुपचे मेंबर. ग्रुप म्हटले की अनेक मेंबर आणि त्यांच्या अनेक तऱ्हा ह्या आल्याच. पण काही काही मेंबरची नावे अशी काही असतात की ती व्यक्ती खरी कोण आहे हेच मुळी समजत नाही. हीच थीम / विषय आजच्या विडंबनाचा आहे. 

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख....

एका ग्रुपवर होती, मेंबर हो अनेक 
होते अकौंट खोटे, त्यांच्या मध्ये ही एक 

कोणी न त्यास देई एक साधाही कमेंट
कोणा ही न संगे झाला त्याचा कधी समेट 
एकटे पाडती त्याला, त्या ग्रुपचे काही लोकं 
होते अकौंट खोटे, त्यांच्या मध्ये ही एक 

बोले न तो कुणाशी, कविता करी जराशी 
केली जरी हुशारी, बोले ना तो तयाशी 
त्याच्यात काय होती अशी कोणती सणक 
होते अकौंट खोटे, त्यांच्या मध्ये ही एक 

एके दिनी परंतु अद्मीनला त्या कळाले 
खवळले पित्त त्याचे, तोंडचे पाणी पळाले 
भाळी उठले त्याच्या, काळजीचे भाव अनेक 
खाते नसून होता, तो व्हायरस एक... 


मिलिंद जोशी, नाशिक..................