सुप्रभात मित्रांनो ............ मकर संक्रांती निमित्ताने आपणा
सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा ............संक्रांतीची एक छोटीशी पण उत्तम
माहितीपूर्ण पोस्टची भेट ...........
इंग्रजीत लोक एक विष कमी म्हणून अनेक "Wishes" देतात ...........मी तुम्हा सर्वांसाठी "अमृत" चिंतितो ............
तिळगुळातला गुळ फक्त गोड नसतो तर त्यात लोह, खनिजे, २१ प्रकारचे क्षार, उर्जा भरपूर असते ........ती तुमच्या कार्यात दिसू दे .........हे क्षार तुमच्या शरीरातील जी वीज असते ना की ज्या विजेमुळे तुम्हाला सगळ्या संवेदना होतात तर त्या विजेच्या वहनासाठी आवश्यक असतात.मित्रांनो आपले हृदय सुद्धा याच विजेवर चालते. याचे वहन बिघडले तर मग “पेसमेकर” बसवावा लागतो. आपल्या शरीरात उणे [मायनस] ५० ते ७० Nano व्होल्टस इतके विजेचे वहन होत असते. आणि हाच आपल्या शरीरातील “वायू” किंवा वात होय असे तुम्ही म्हणून शकता. याचे काम बिघडले की ८० प्रकारचे वातरोग होतात. अर्दितवात- तोंड वाकडे होणे, मन्यास्तंभ- मान आखडणे, Palaralysis- लकवा मारणे, संधिवात, आमवात वगैरे वाताचे विविध प्रकार आहेत. पूर्वी कोकणात उन्हाच्या वेळी दुपारी कोणी घरी आले तर त्याला प्रथम त्याच्या हातावर गुळ दिला जात असे आणि नंतर पाणी ............ म्हणजे जेणे करून उन्हातून आल्या आल्या पाणी प्यायले जायला नको आणि उन्हातून घामावाटे बाहेर गेलेले क्षार भरून निघावेत ....जसे कंदिलाच्या गरम काचेवर पाणी उडाले तर ती तडकते तसेच आपल्या शरीराचे होते. उन्हातून आल्यावर एकदम थंड पाणी पिणे योग्य नाही. शरीरातील व्यवस्था बिघडते मग .....अर्थात वातरोगांचे गुळ हे औषध नव्हे किंवा क्षार कमी पडणे हेच एकमेव कारण सुद्धा नव्हे बरं का दाजी .......... शाकाहारी लोकांना लोह कमी मिळते ते गुळाच्या योग्य सेवनातून भरून काढले जाऊ शकते. गुळ पाणी प्यायल्याने फुफुस विकार सुद्धा दूर राहतात असेही आढळून आलेले आहे. आपले वडारी समाज बांधव सकाळी भर उन्हात कामाला सुरवात करण्यापूर्वी एक पेलाभर गुळाचे पाणी पिऊन सुरवात करत असत. सध्याचे मला माहित नाही. यामुळे दिवसभर शरीराला प्रचंड मेहनत करण्याची शक्ती तर मिळतेच पण उन्हाचा त्रास सुद्धा कमी जाणवतो. मित्रांनो तुम्ही कधी लिंबाचे वगैरे सरबत घेतलेत तर ते शक्यतो गुळ घालून बनवून घ्या. म्हणजे अनायासे तुम्हाला २१ प्रकारचे क्षार, उर्जा, लोह हे सगळे मिळेल.
तीळ पुढारयांसारखे नुसते पांढरे कपडे घालून आलेले नसतात तर त्यांच्या अंतरात एक स्नेह असतो ..........कॅलशियम असते .......प्रथिने असतात .........पोटातील अल्सर तीळ तेल पोटात घेतल्याने बरा होतो. वजन कमी होते. शौचास साफ होते. म्हातारपण लवकर येत नाही. तिळाच्या तेलाच्या मालिशने त्वचा उजळते. अंगात शक्ती वाढते. श्रम सहन करण्याची शक्ती येते. लघवीला जास्त वेळेला होत असल्यास सकाळ संध्याकाळ ५-५ ग्राम ओवा आणि तीळ मिसळून चावून खाल्ले तर लघवीचा त्रास कमी होतो. तिळाचे तेल डोक्याला लावल्याने केस काळे राहतात. फक्त तिळाचे तेल डोळ्यांना मात्र नुकसानदायक आहे. त्यामुळे डोळ्यांना लागू देऊ नये. २० ग्राम तीळ गरम पाण्यात वाटून त्यात २० ग्राम ताजे लोणी घालून खाल्ले तर रक्ती मुळव्याध बरी होते.
साजूक तूप --------- पूर्वी दुध, तूप, लोणो, दही, ताक हे सर्व म्हंटले की ते गाईच्या दुधापासून बनवलेले असे आयुर्वेदात किंवा एकूणच भारतात अपेक्षित होते. आता आपल्याकडचे “गौळी” {गवळी हा शब्द गौ म्हणजे गाय पाळणारे या वरूनच आलेला आहे.] म्हशी पाळतात आणि आपण सारेजण म्हशीचे दुध पितो या अर्थाने “अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी” असे म्हणायला हरकत नाही. व्यायाम करणाऱ्या लोकांना हे म्हशीचे दुध ठीक पण गायीचे दुध पचायला हलके असते. जवळपास सर्वांना हे दुध मानवते. बकरीचे दुध अगदी जराजर्जर लोकांना उत्तम पण त्याचे परिणाम दीर्घकालीन टिकणारे नव्हेत. म्हणून गायीचे दुध उत्तम. विदेशी लोक आपल्या सारखे आता गायीचे दुध पितात आणि आपण मात्र म्हशीचे .......... विदेशात म्हशीचे दुध अभावानेच मिळते. तिकडे सोयाबीनचे, बदामाचे, शेंगदाण्याचे, नारळाचे असे विविध प्रकारचे आणि फ्लेवर्ड दुध मिळते. तर हे जे तूप आहे ना ते शरीराला एक सुंदर आकार देते. त्वचा नितळ बनवते. उर्जा देते. संकटकाळासाठी लागणारी उर्जा शरीरात साठवते. शरीरामध्ये लुब्रीकेशनचे काम करते. मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना त्यातील चरबीतून उत्तम Fats मिळतात पण त्याला या तुपाची सर येऊ शकत नाही.
यात चवीला आणि खुसखुशीतपणा आणायला थोडे खोबरे घातले जाते. खोबरे अत्यंत पौष्टिक आहे. ज्या व्यक्तींना अन्न पचत नाही त्यांच्यासाठी दिवसभर थोडे थोडे शहाळ्याचे पाणी घेणे, नारळाचे दुध घेणे हे अतिशय उपयुक्त असते. काही निसर्गोपचार केंद्रांवर अतिशय वाईट अवस्थेत असलेल्या रुग्णांना गुदमार्गावाटे म्हणजे संडासच्या जागेतून एनिमाद्वारे फळांचे रस, नारळाचे पाणी, नारळाचे दुध, शिवांबू [स्वमुत्र] दिले जाऊन त्यांना पुन्हा जीवन दिले गेलेले आहे. तुम्हाला आश्चर्य आणि वाचायला अत्यंत विचित्र वाटेल पण निसर्गाचे हा उलटफेर आहे की मोठ्या आतड्यातील ज्याला आपण मल म्हणतो तिथेच आपण खाल्लेल्या अन्नद्रव्याचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. त्यामुळेच आपण सारखी पोट साफ करणारी द्रव्ये घेतली किंवा जास्त जुलाब झाले तर इथला मल निघून जाऊन फार अशक्तपणा येतो. अर्थात या वेळेस पाणी आणि क्षार सुद्धा जास्त प्रमाणात कमी झाल्याने हा अशक्तपणा आलेला असतो. त्यामुळे जर या निसर्गोपचार केंद्रांवर गुद मार्गावाटे पोषण दिले जाऊन रुग्णांचे प्राण वाचवले गेले. कारण अशा रुग्णांच्या जठर आणि लहान आतडे वगैरे भागांची मोठ्या प्रमाणात क्षती म्हणजे हानी झालेली होती. तर सांगायचे आरण नारळ पाण्यात फक्त “सी” विटामिन नसते. इतर सर्व घटक असतात. त्यामुळे त्यात लिंबू पिळून नारळ पाणी घेतले तर हा एक पूर्ण आहार होऊ शकतो. नारळाच्या झाडाला म्हणजे माडाला कल्पवृक्ष म्हंटले गेलेले आहे. त्याच्या प्रत्येक अंगाचा माणसाला अत्यंत मोठ्या प्रमाणात उपयोग होत आलेला आहे.
यामध्ये चवीला किंचित वेलदोडा किंवा वेलची सुद्धा काहीजण घालतात. पण काहीच जण. वेलचीचा पोट साफ होणे, कफ कमी करणे वगैरे अनेक विकारांवर उपयोग होतो. त्यावर मी वेगळ्या पोस्ट मध्ये सांगेन.
तर बघा हिंदू धर्माने किती विचार करून धर्मातील या चालीरीती, खानपान, व्यवहार, आहार-विहार हे योजलेले आहे. आत्ता थंडी असते आणि शरीरात उष्णता निर्माण व्हावी आणि ती धरून ठेवली जावी म्हणून उष्णता आकर्षित करून घेणारे आणि आणि ती धरून सुद्धा ठेवणारे काळ्या रंगाचे कपडे संक्रांतीला भगिनी परिधान करतात. जेव्हढा काळोख जास्त .....चांदण्या दिसण्याचे प्रमाण तितके जास्त ....... म्हणून वर चांदण्या रेखलेली साडी दिसते किती सुंदर नाही? काळोखातच तर उजेड किंवा प्रकाशाची छोटीशी तिरीप सुद्धा किती उठून दिसते नाही का? एरवी मात्र हिंदू धर्माने हा काळा रंग त्याज्य मानलेला आहे. निषिद्ध ठरवलेला आहे.
आता सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात जायला लागेल. आपल्या पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या सन्मुख येईल म्हणजे समोर येईल. आणि उन्हं वाढायला लागतील. थंडी कमी होईल. शेकोट्या कमी होतील आणि सरबताच्या गाडीवर, थंडगार लस्सीच्या दुकानात, कलिंगडाच्या ढिगाकडे गर्दी वाढायला लागेल. गॉगल विकणाऱ्या, टोप्या घालणाऱ्या लोकांचे पोट भरायला लागेल. पण मनातली प्रेम, स्नेह, मित्रता, आपुलकी, जिव्हाळा यांची शेकोटी कधीच विझू देऊ नका मित्रांनो .........
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देऊन आजच्या पुरेसा थांबतो .......तिळगुळ घ्या गोड गोड बोला .............
नेहमीच गोड बोलणारा आणि गोड वागणारा सदैव आपला मित्र,
Dr. हेमंत उर्फ कलादास ............
तिळगुळातला गुळ फक्त गोड नसतो तर त्यात लोह, खनिजे, २१ प्रकारचे क्षार, उर्जा भरपूर असते ........ती तुमच्या कार्यात दिसू दे .........हे क्षार तुमच्या शरीरातील जी वीज असते ना की ज्या विजेमुळे तुम्हाला सगळ्या संवेदना होतात तर त्या विजेच्या वहनासाठी आवश्यक असतात.मित्रांनो आपले हृदय सुद्धा याच विजेवर चालते. याचे वहन बिघडले तर मग “पेसमेकर” बसवावा लागतो. आपल्या शरीरात उणे [मायनस] ५० ते ७० Nano व्होल्टस इतके विजेचे वहन होत असते. आणि हाच आपल्या शरीरातील “वायू” किंवा वात होय असे तुम्ही म्हणून शकता. याचे काम बिघडले की ८० प्रकारचे वातरोग होतात. अर्दितवात- तोंड वाकडे होणे, मन्यास्तंभ- मान आखडणे, Palaralysis- लकवा मारणे, संधिवात, आमवात वगैरे वाताचे विविध प्रकार आहेत. पूर्वी कोकणात उन्हाच्या वेळी दुपारी कोणी घरी आले तर त्याला प्रथम त्याच्या हातावर गुळ दिला जात असे आणि नंतर पाणी ............ म्हणजे जेणे करून उन्हातून आल्या आल्या पाणी प्यायले जायला नको आणि उन्हातून घामावाटे बाहेर गेलेले क्षार भरून निघावेत ....जसे कंदिलाच्या गरम काचेवर पाणी उडाले तर ती तडकते तसेच आपल्या शरीराचे होते. उन्हातून आल्यावर एकदम थंड पाणी पिणे योग्य नाही. शरीरातील व्यवस्था बिघडते मग .....अर्थात वातरोगांचे गुळ हे औषध नव्हे किंवा क्षार कमी पडणे हेच एकमेव कारण सुद्धा नव्हे बरं का दाजी .......... शाकाहारी लोकांना लोह कमी मिळते ते गुळाच्या योग्य सेवनातून भरून काढले जाऊ शकते. गुळ पाणी प्यायल्याने फुफुस विकार सुद्धा दूर राहतात असेही आढळून आलेले आहे. आपले वडारी समाज बांधव सकाळी भर उन्हात कामाला सुरवात करण्यापूर्वी एक पेलाभर गुळाचे पाणी पिऊन सुरवात करत असत. सध्याचे मला माहित नाही. यामुळे दिवसभर शरीराला प्रचंड मेहनत करण्याची शक्ती तर मिळतेच पण उन्हाचा त्रास सुद्धा कमी जाणवतो. मित्रांनो तुम्ही कधी लिंबाचे वगैरे सरबत घेतलेत तर ते शक्यतो गुळ घालून बनवून घ्या. म्हणजे अनायासे तुम्हाला २१ प्रकारचे क्षार, उर्जा, लोह हे सगळे मिळेल.
तीळ पुढारयांसारखे नुसते पांढरे कपडे घालून आलेले नसतात तर त्यांच्या अंतरात एक स्नेह असतो ..........कॅलशियम असते .......प्रथिने असतात .........पोटातील अल्सर तीळ तेल पोटात घेतल्याने बरा होतो. वजन कमी होते. शौचास साफ होते. म्हातारपण लवकर येत नाही. तिळाच्या तेलाच्या मालिशने त्वचा उजळते. अंगात शक्ती वाढते. श्रम सहन करण्याची शक्ती येते. लघवीला जास्त वेळेला होत असल्यास सकाळ संध्याकाळ ५-५ ग्राम ओवा आणि तीळ मिसळून चावून खाल्ले तर लघवीचा त्रास कमी होतो. तिळाचे तेल डोक्याला लावल्याने केस काळे राहतात. फक्त तिळाचे तेल डोळ्यांना मात्र नुकसानदायक आहे. त्यामुळे डोळ्यांना लागू देऊ नये. २० ग्राम तीळ गरम पाण्यात वाटून त्यात २० ग्राम ताजे लोणी घालून खाल्ले तर रक्ती मुळव्याध बरी होते.
साजूक तूप --------- पूर्वी दुध, तूप, लोणो, दही, ताक हे सर्व म्हंटले की ते गाईच्या दुधापासून बनवलेले असे आयुर्वेदात किंवा एकूणच भारतात अपेक्षित होते. आता आपल्याकडचे “गौळी” {गवळी हा शब्द गौ म्हणजे गाय पाळणारे या वरूनच आलेला आहे.] म्हशी पाळतात आणि आपण सारेजण म्हशीचे दुध पितो या अर्थाने “अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी” असे म्हणायला हरकत नाही. व्यायाम करणाऱ्या लोकांना हे म्हशीचे दुध ठीक पण गायीचे दुध पचायला हलके असते. जवळपास सर्वांना हे दुध मानवते. बकरीचे दुध अगदी जराजर्जर लोकांना उत्तम पण त्याचे परिणाम दीर्घकालीन टिकणारे नव्हेत. म्हणून गायीचे दुध उत्तम. विदेशी लोक आपल्या सारखे आता गायीचे दुध पितात आणि आपण मात्र म्हशीचे .......... विदेशात म्हशीचे दुध अभावानेच मिळते. तिकडे सोयाबीनचे, बदामाचे, शेंगदाण्याचे, नारळाचे असे विविध प्रकारचे आणि फ्लेवर्ड दुध मिळते. तर हे जे तूप आहे ना ते शरीराला एक सुंदर आकार देते. त्वचा नितळ बनवते. उर्जा देते. संकटकाळासाठी लागणारी उर्जा शरीरात साठवते. शरीरामध्ये लुब्रीकेशनचे काम करते. मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना त्यातील चरबीतून उत्तम Fats मिळतात पण त्याला या तुपाची सर येऊ शकत नाही.
यात चवीला आणि खुसखुशीतपणा आणायला थोडे खोबरे घातले जाते. खोबरे अत्यंत पौष्टिक आहे. ज्या व्यक्तींना अन्न पचत नाही त्यांच्यासाठी दिवसभर थोडे थोडे शहाळ्याचे पाणी घेणे, नारळाचे दुध घेणे हे अतिशय उपयुक्त असते. काही निसर्गोपचार केंद्रांवर अतिशय वाईट अवस्थेत असलेल्या रुग्णांना गुदमार्गावाटे म्हणजे संडासच्या जागेतून एनिमाद्वारे फळांचे रस, नारळाचे पाणी, नारळाचे दुध, शिवांबू [स्वमुत्र] दिले जाऊन त्यांना पुन्हा जीवन दिले गेलेले आहे. तुम्हाला आश्चर्य आणि वाचायला अत्यंत विचित्र वाटेल पण निसर्गाचे हा उलटफेर आहे की मोठ्या आतड्यातील ज्याला आपण मल म्हणतो तिथेच आपण खाल्लेल्या अन्नद्रव्याचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. त्यामुळेच आपण सारखी पोट साफ करणारी द्रव्ये घेतली किंवा जास्त जुलाब झाले तर इथला मल निघून जाऊन फार अशक्तपणा येतो. अर्थात या वेळेस पाणी आणि क्षार सुद्धा जास्त प्रमाणात कमी झाल्याने हा अशक्तपणा आलेला असतो. त्यामुळे जर या निसर्गोपचार केंद्रांवर गुद मार्गावाटे पोषण दिले जाऊन रुग्णांचे प्राण वाचवले गेले. कारण अशा रुग्णांच्या जठर आणि लहान आतडे वगैरे भागांची मोठ्या प्रमाणात क्षती म्हणजे हानी झालेली होती. तर सांगायचे आरण नारळ पाण्यात फक्त “सी” विटामिन नसते. इतर सर्व घटक असतात. त्यामुळे त्यात लिंबू पिळून नारळ पाणी घेतले तर हा एक पूर्ण आहार होऊ शकतो. नारळाच्या झाडाला म्हणजे माडाला कल्पवृक्ष म्हंटले गेलेले आहे. त्याच्या प्रत्येक अंगाचा माणसाला अत्यंत मोठ्या प्रमाणात उपयोग होत आलेला आहे.
यामध्ये चवीला किंचित वेलदोडा किंवा वेलची सुद्धा काहीजण घालतात. पण काहीच जण. वेलचीचा पोट साफ होणे, कफ कमी करणे वगैरे अनेक विकारांवर उपयोग होतो. त्यावर मी वेगळ्या पोस्ट मध्ये सांगेन.
तर बघा हिंदू धर्माने किती विचार करून धर्मातील या चालीरीती, खानपान, व्यवहार, आहार-विहार हे योजलेले आहे. आत्ता थंडी असते आणि शरीरात उष्णता निर्माण व्हावी आणि ती धरून ठेवली जावी म्हणून उष्णता आकर्षित करून घेणारे आणि आणि ती धरून सुद्धा ठेवणारे काळ्या रंगाचे कपडे संक्रांतीला भगिनी परिधान करतात. जेव्हढा काळोख जास्त .....चांदण्या दिसण्याचे प्रमाण तितके जास्त ....... म्हणून वर चांदण्या रेखलेली साडी दिसते किती सुंदर नाही? काळोखातच तर उजेड किंवा प्रकाशाची छोटीशी तिरीप सुद्धा किती उठून दिसते नाही का? एरवी मात्र हिंदू धर्माने हा काळा रंग त्याज्य मानलेला आहे. निषिद्ध ठरवलेला आहे.
आता सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात जायला लागेल. आपल्या पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या सन्मुख येईल म्हणजे समोर येईल. आणि उन्हं वाढायला लागतील. थंडी कमी होईल. शेकोट्या कमी होतील आणि सरबताच्या गाडीवर, थंडगार लस्सीच्या दुकानात, कलिंगडाच्या ढिगाकडे गर्दी वाढायला लागेल. गॉगल विकणाऱ्या, टोप्या घालणाऱ्या लोकांचे पोट भरायला लागेल. पण मनातली प्रेम, स्नेह, मित्रता, आपुलकी, जिव्हाळा यांची शेकोटी कधीच विझू देऊ नका मित्रांनो .........
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देऊन आजच्या पुरेसा थांबतो .......तिळगुळ घ्या गोड गोड बोला .............
नेहमीच गोड बोलणारा आणि गोड वागणारा सदैव आपला मित्र,
Dr. हेमंत उर्फ कलादास ............
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा