वैचारिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वैचारिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

माणसाच्या जगण्याचा आणि जगण्याच्या प्रयोजनाचा शोध अनादी काळापासून सुरु आहे , आणि तो सुरूच राहणार आहे.
ज्यांना तो लागला ते प्रेषित ठरले. बुद्ध, महावीर, नानक यांनी लोकांना तो मार्ग दाखवला.
परंतु त्यांचे अनुयायी मात्र नेमके उलट मार्गाने जात राहतात हीच तर शोकांतिका आहे,..
त्यामुळे असा शोध लागेपर्यंत आपण चालत राहायचे. 
चालता चालता नवनवीन शोध लागत रहातात, आपण त्यांचा आनंद घ्यावा.
अवघड गोष्टींची आस लागणे हे स्वत्वाच्या जाणिवेचे एक लक्षण आहे,...
याचा अर्थ आपले अंतर्मन जागृत आहे.
आणि जागृत अंतर्मनाच्या माणसाना जागोजागी अज्ञानाचा सामना करावा लागतो,....
आणि असा सामना करतानाच समविचारी व्यक्तींचा शोध लागतो....
एकूणच काय, असा शोध घेत राहण्यामुळे आपल्याला इतरांहून वेगळा असा आत्मानंद प्राप्त होतो...
(रत्नकांत ...)
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे असावे हा आग्रह किंवा दुराग्रह आपण का बाळगावा ?
ज्याने त्याने आपापल्या परीने ते शोधावे ! 
किमान ज्याच्याकडे आहे, त्याच्या मागे आपण ठामपणे उभे राहावे असे मला वाटते.
ज्यांच्या अंगी हाती घेतलेल्या कार्यात यश येईल कि नाही याचा विचार न करता अखंड पाठपुरावा करण्याची चिकाटी आहे. स्वतःच्या भूमिकेची स्पष्ट जाणीव आणि मायभूमी विषयी नितांत भक्ती आहे, अशा व्यक्तींना होणारा प्रचंड विरोध, आणि तो सहन करायची त्यांची ताकद पहिली, कि हात आपोआप सलाम करायला वर जातो.
त्यांना पाठींबा देऊन त्यांचे बळ वाढवणे, एव्हढे सोपे काम तर प्रत्येक सुजाण माणसाला सहज जमेल. 
त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधात बसायची गरज नाही.
विश्वासाचे झाड रुजायला बी जमिनीत खोल पुरावे लागते,
मग ते झाड खूप उंच वाढते...
मात्र त्याचे खोड अत्यंत नाजूक असते...
गैरसमजाच्या हलक्याश्या झुळुकीनेहि ते उन्मळून पडते.... 
त्यासाठी त्याभोवती समंजसपणाचे काटेरी कुंपण घालावे लागते.....