मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

माणसाच्या जगण्याचा आणि जगण्याच्या प्रयोजनाचा शोध अनादी काळापासून सुरु आहे , आणि तो सुरूच राहणार आहे.
ज्यांना तो लागला ते प्रेषित ठरले. बुद्ध, महावीर, नानक यांनी लोकांना तो मार्ग दाखवला.
परंतु त्यांचे अनुयायी मात्र नेमके उलट मार्गाने जात राहतात हीच तर शोकांतिका आहे,..
त्यामुळे असा शोध लागेपर्यंत आपण चालत राहायचे. 
चालता चालता नवनवीन शोध लागत रहातात, आपण त्यांचा आनंद घ्यावा.
अवघड गोष्टींची आस लागणे हे स्वत्वाच्या जाणिवेचे एक लक्षण आहे,...
याचा अर्थ आपले अंतर्मन जागृत आहे.
आणि जागृत अंतर्मनाच्या माणसाना जागोजागी अज्ञानाचा सामना करावा लागतो,....
आणि असा सामना करतानाच समविचारी व्यक्तींचा शोध लागतो....
एकूणच काय, असा शोध घेत राहण्यामुळे आपल्याला इतरांहून वेगळा असा आत्मानंद प्राप्त होतो...
(रत्नकांत ...)

1 टिप्पणी: